• Download App
    कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्रWill not contest elections until Article 370 is reinstated, Mehbooba Mufti's criticism of central government

    कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी (22 मार्च) वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, जोपर्यंत भारत सरकार कलम 370 पुन्हा आणत नाही तोपर्यंत त्या विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. माझ्यासाठी हा भावनिक मुद्दा आहे, असेही त्या म्हणाल्या. Will not contest elections until Article 370 is reinstated, Mehbooba Mufti’s criticism of central government

    मुफ्ती म्हणाल्या की, “जेव्हा मी सभागृहाची सदस्य म्हणून शपथ घेतली तेव्हा ते दोन संविधानांतर्गत होते, जम्मू-काश्मीरची राज्यघटना आणि भारतीय राज्यघटना, एकाच वेळी दोन ध्वजांसह. परंतु माझ्यासाठी हा एक भावनिक मुद्दा आहे.”

    संसदीय निवडणूक लढवणार का असे विचारले असता, पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या की, मला खात्री नाही. संसदीयबाबत (निवडणुका), मला अजून काहीही माहीत नाही.”

    मुफ्ती यांना विचारण्यात आले की, कलम 370 ची पुन्हा अंमलबजावणी करण्याची मागणी करणारी युती पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (PAGD) हे युती म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार का? यावर त्या म्हणाल्या की, यासंदर्भात काहीही बोलणे घाईचे होईल. आम्ही एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे लढणार, याबाबत कधीही चर्चा केली नाही. जेव्हा आम्ही सगळे एकत्र बोलू त्यानंतरच याबद्दल सांगू शकेन.

    ‘पंचायत हा विधानसभेला पर्याय असू शकत नाही’

    जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही बहाल करण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर मेहबूबा म्हणाल्या की, जर पंचायत निवडणुका ही लोकशाहीची खरी कसोटी आहे, तर देशात पंतप्रधान आणि गृहमंत्री ही पदे का आहेत. पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या की, “त्या पंचायत निवडणुकीबद्दल बोलत आहेत. या निवडणुका पहिल्यांदाच झाल्या असे नाही. या निवडणुका (नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक) शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या काळापासून होत आहेत. पंचायत हीच लोकशाहीची खरी कसोटी असेल, तर पंतप्रधान आणि गृहमंत्री ही पदे कशाला आहेत? पंचायत हा विधानसभेला पर्याय असू शकत नाही.



    ‘काश्मिरातील लोकांना मोडून काढण्याची केंद्राची योजना’

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका न घेण्याबाबत विचारले असता मेहबूबा म्हणाल्या की, केंद्र सरकार घाबरले आहे की जर निवडून आलेले सरकार स्थापन झाले तर ते त्यांचा ‘छुपा अजेंडा’ चालवू शकणार नाहीत. त्या म्हणाल्या, ‘त्यांना कशाची भीती वाटते ते मला माहीत नाही. ते दर आठवड्याला जे हुकूम जारी करत आहेत ते जम्मू-काश्मीरमधील लोकांना आणखी कमकुवत करत आहेत आणि त्यांना ते पुढे चालू ठेवायचे आहे.” मेहबुबा यांनी आरोप केला की, जम्मू-काश्मीरमधील लोकांना तोडून त्यांना गुडघ्यावर आणण्याची त्यांची योजना होती. म्हणूनच त्यांना असेंब्ली नको आहे. त्यांना वाटत असेल की ती अतिशक्तिशाली होईल आणि कदाचित हुकूम पाळणार नाही.”

    कुपवाडातील शारदा मंदिर उद्घाटनाचे मेहबूबांकडून स्वागत

    सुरुवातीला त्यांनी केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) शारदा देवी मंदिर उघडण्याचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, हे खूप छान घडत आहे. आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की आपल्याला कनेक्ट करणे, सामंजस्य ठेवणे आणि समस्या सोडवणे आवश्यक आहे. शारदा मंदिर उघडणे ही खूप चांगली गोष्ट आहे. याचीच काश्मिरी पंडित वाट पाहत होते.”

    Will not contest elections until Article 370 is reinstated, Mehbooba Mufti’s criticism of central government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!