• Download App
    कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत।When will the second wave of Corona Go? ; The Third wave Is also predicted by scientists

    कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार ? आणि तिसरी कधी येणार याचे भाकीत शास्त्रज्ञानी केले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जनतेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते दुसरी लाट जुलै अखेर ओसरणार असून पाच ते सहा महिन्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका आहे. When will the second wave of Corona Go? ; The Third wave Is also predicted by scientists

    सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या शास्त्रज्ञांच्या तीन सदस्यांच्या पॅनलने लाट कधी संपणार आणि तिसरी लाट कधी येईल, याचा अंदाज व्यक्त केला आहे.



    भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. तर, जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. SUTRA मॉडेलचा वापर करुन शास्त्रज्ञांनी हे भाकीत केले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज 1.5 लाख रुग्ण आढळतील. तर, जूनपर्यंत ही संख्या घटून 20,000 जाईल.

    महाराष्ट्रात कोरोनाचा उच्चांक

    पॅनलमधील एक सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं, की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवासारख्या राज्यांनी अधिक रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. मॉडेलनुसार, सहा ते आठ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल. प्रोफेसर अग्रवाल म्हणाले, लसीकरण झाल्याने अधिक लोक प्रभावित होणार नाहीत. ऑक्टोबर 2021 पर्यंत तिसरी लाट येणार नाही.

    When will the second wave of Corona Go? ; The Third wave Is also predicted by scientists

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत