देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागांवर ३०१ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये भाजपचे ४०, काँग्रेस ३७, आप ३९, टीएमसी २६, एमजीपी १३ आणि ६८ अपक्ष आहेत. राज्यातील एकूण ११.५६ लाख मतदार आज आपले भवितव्य ठरवणार आहेत. Voting begins in Goa CM Sawant claims BJP will form government again; Utpal Parrikar confident of victory
वृत्तसंस्था
पणजी : देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागांवर ३०१ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये भाजपचे ४०, काँग्रेस ३७, आप ३९, टीएमसी २६, एमजीपी १३ आणि ६८ अपक्ष आहेत. राज्यातील एकूण ११.५६ लाख मतदार आज आपले भवितव्य ठरवणार आहेत.
मतदान सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीच्या जोरावर राज्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले. सावंत यांनीही १०० टक्के बहुमताचा दावा केला.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजीत मतदान केले. या जागेवरून ते निवडणूक लढवत आहेत. उत्पल यांनी माध्यमांजवळ त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला, मात्र त्यांच्या भाजप विरोधावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मौन बाळगले. भाजपला विरोध करून त्यांना वडिलांच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूतीची मते नष्ट करायची नाहीत, असे मानले जात आहे. त्याचबरोबर त्यांना निवडणुकीनंतरही शक्यतांची दारे खुली ठेवायची आहेत.
- Goa Election : गोव्यात भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी दिला पदाचा राजीनामा
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होताच गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रीटा श्रीधरन मतदानासाठी पोहोचल्या. तेलीगाव विधानसभेच्या 15 क्रमांकाच्या बुथवर जाऊन त्यांनी मतदान केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाला जाण्यापूर्वी रुद्रेश्वर मंदिरात पूजा केली.
काँग्रेस नेते मायकल लोबो म्हणाले, “मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे मनोहर पर्रीकर म्हणाले होते. मुले आली तर ती स्वतःहून येतील. उत्पल पर्रीकर जिंकले तर त्यांच्याशी बोलू.”
गेल्या दोन वेळा राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला गोवा कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ द्यायचा नाही. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या या राज्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणतात, कारण इथे एक बंदर आहे, ज्यातून लाखो-कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो. बड्या उद्योगपतींनी येथे मोठी गुंतवणूक केली आहे. गोवा हे देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेतही त्याचा मोठा वाटा आहे.
Voting begins in Goa CM Sawant claims BJP will form government again; Utpal Parrikar confident of victory
महत्त्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहूल गांधींवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले राहूल गांधी आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना
- आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आहे राहूल गांधींचा राग, कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे दिली होती खायला
- महाराष्ट्रातील वाघाची कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याने शेळी, भोपाळमध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे विरोधात डरकाळ्या
- इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद
- देशातील सर्वात मोठ्या बॅँक फसवणूक प्रकरणात एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षावर गुन्हा