भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after the Pulwama attack
विशेष प्रतिनिधी
जम्मू : भारत-पाकिस्तान सीमेवर सैनिक दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत.जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सुरक्षा दल सतत गस्त घालून दिवे लावत आहेत. दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.
तीन वर्षांनंतर दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली.पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील ही परंपरा बंद झाली होती.
पूंछमधील चक्कन दा बाग येथे भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.
तसेच कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर येथील किशनगंगा नदीवरील कमन अमन सेतू, उरी आणि तिथवाल येथेही मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली.दोन्ही देशांमधील नियंत्रण रेषेवरील युद्धविराम कराराचे काटेकोरपणे पालन होत असताना ही घटना घडली.
The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after the Pulwama attack
महत्त्वाच्या बातम्या
- …तर ST कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- ब्रिटनने जगातील पहिल्या अँटीव्हायरल औषधाला दिली मान्यता ; कोरोनाच्या उपचारात असेल प्रभावी
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- 1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल – किरीट सोमय्या