• Download App
    पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, समजनेवाले को इशारा काफी; पवारांची भाजपला "टोपी"!! |The early morning swearing-in ended President's rule, understandable enough; Pawar's "hat" to BJP!!

    पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, समजनेवाले को इशारा काफी; पवारांची भाजपला “टोपी”!!

    प्रतिनिधी

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केल्यावर एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवारांना या शपथविधीची पूर्ण माहिती होती. कारण त्यांच्याशीच चर्चा झाली होती, असा स्पष्ट खुलासा केला.The early morning swearing-in ended President’s rule, understandable enough; Pawar’s “hat” to BJP!!

    मात्र, देवेंद्र फडणवीस खोटे बोलतील, असे वाटले नव्हते असे वक्तव्य पवारांनी करून त्यांना खोटे पाडायचा प्रयत्न केला होता. पण आता या संदर्भात पवारांनी “समझनेवाले को इशारा काफी है”, असे सांगत आपणच भाजपला टोपी घातल्याची कबुली दिली आहे. चिंचवड मध्ये पोटनिवडणुकीसाठी आलेल्या पवारांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी समजणे वाले को इशारा काफी है, असे वक्तव्य केले.



    पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्यातून एक फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

    देशात जातीय तणाव वाढवायचा. हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करायची. तोडा आणि फोडा या ब्रिटीशांच्या नितीनुसार राज्य करायचे. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल, असा दावाही शरद पवारांनी केला.

    The early morning swearing-in ended President’s rule, understandable enough; Pawar’s “hat” to BJP!!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!