• Download App
    दिल्ली सरकार नागरी शेतीचा मेगा प्लॅन सुरू करणार |The Delhi government will launch a mega plan for urban agriculture

    दिल्ली सरकार नागरी शेतीचा मेगा प्लॅन सुरू करणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली राज्य सरकार शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवणार आहे. मोठ्या मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना भाज्या घरी वाढवण्यास प्रोत्साहित केले जाईल, ज्यांचा वापर जास्त केला जातो. या उपक्रमामुळे त्यांना ताजी भाजी मिळेल आणि पैशांचीही बचत होईल. याशिवाय राजधानीत हिरवळही वाढेल आणि दिल्ली सरकारला प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल. The Delhi government will launch a mega plan for urban agriculture

    या मेगा प्लॅनचा उद्देश लोकांना त्यांच्या घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये आणि व्हरांड्यात त्यांच्या स्वत:च्या वापराच्या भाज्या आणि फळे तयार करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार गोलमेज परिषदेचे आयोजन करणार आहे. याबाबत जिल्हा पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे.



    दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी उद्यान विभाग नोडल विभाग असेल. त्याचबरोबर प्रदूषणाशी संबंधित समस्यांचे मूल्यांकन महापालिकेच्या प्रभाग स्तरावर केले जाणार आहे. याबाबत जिल्हा पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

    या अभियानांतर्गत चर्चा करण्यासाठी २५ एप्रिल रोजी पुसा संस्थेच्या तज्ज्ञांसोबत गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याच वेळी, दिल्ली सरकारला जिल्हा पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. ही समिती महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील वॉर्डांमधील प्रदूषणासंबंधीच्या समस्यांचे मुल्यांकन करणार आहे. अशाप्रकारे, प्रभाग स्तरावरील पर्यावरण कृती आराखडा तयार करणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

    पर्यावरण रक्षणाला जनआंदोलन बनवण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. या समितीमध्ये आरडब्ल्यूए, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे लोक आणि आमदार आणि नगरसेवकांचे प्रतिनिधी असतील. गोलमेज परिषदेत समिती स्थापन करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी शेतीसाठी व्यापक मोहिमेतही समितीचा सहभाग असेल. हिवाळ्याच्या काळात दिल्लीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढते.

    दिल्लीतील शेतीयोग्य जमीन सातत्याने कमी होत आहे आणि काँक्रीटच्या इमारतींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात दिल्लीत जमिनीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार नागरी शेतीचा मेगा प्लॅन सुरू करणार आहे.

    The Delhi government will launch a mega plan for urban agriculture

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोट: उमरला जमातकडून 40 लाख मिळाले होते, हिशोबावरून उमर-मुझम्मिल भांडले; पोलिसांकडून झाडाझडती सुरू

    Vijay TVK Indoor : करूर चेंगराचेंगरीनंतर 2 महिन्यांनी विजयचे इनडोअर कॅम्पेन; क्यूआर कोडद्वारे फक्त 2000 लोकांना प्रवेश

    SIR Campaign : 19 दिवसांत 6 राज्यांत 15 बीएलओंचा मृत्यू; SIR मोहिमेत गुजरात-MP मध्ये प्रत्येकी 4, बंगालमध्ये 3, राजस्थान-तामिळनाडू-केरळमध्ये 3 मृत्यू