मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथील घटना. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror attack;Death of wife and child
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी जवानांवर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे अनेक जवान जखमी झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशानं पाच धाडसी वीर गमावल्याची भावना व्यक्त करत यासंदर्भात ट्विट केलं आहे
मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्यांची पत्नी, मुलगा ,शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.
सर्च ऑपरेशनला सुरुवात
दरम्यान, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूरचा हात?
पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर संघटनेचा हात असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्याप अधिकृतीरित्या कुठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती.
भारत सरकारनं या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. ही संघटना भारतीय सुरक्षा दलांवर हलेल करते. या संघटनेची स्थापना बिश्वेवर सिंह यांनी केली होती.
TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror attack;Death of wife and child
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!