• Download App
    पंचशीरवर तालिबान्यांचा कब्जा; नॉर्दन अलायन्सचा लढा चालू ठेवण्याचा निर्धार । Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir

    पंचशीरवर तालिबान्यांचा कब्जा; नॉर्दन अलायन्सचा लढा चालू ठेवण्याचा निर्धार

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानातल्या पंजशीर खोऱ्यावर अखेर तालिबान्यांनी कब्जा केला. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी पंजशीर खोरे मात्र ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. कारण तेथे नॉर्दन अलायन्सच्या फौजांचा कडवा प्रतिकार होत होता. त्यामुळे तालिबान्यांचे प्रयत्न फोल ठरत होते. अखेर सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी तालिबान्यांनी पंजशीर खोरे ताब्यात घेतले. तरीही नॉर्दन अलायन्सने हार मानलेली नाही. उलट लढा चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir

    १५ ऑगस्टपासून संघर्ष सुरु होता!

    पंजशीरच्या खोऱ्यात तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात संघर्ष सुरु होता. सोमवार हा तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा शेवट दिवस ठरला. तालिबानने आता पंजशीर खोरेही आपल्या ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिकृत माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. १५ ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर केवळ पंजशीर हेच तालिबानच्या नियंत्रणात नव्हते.

    पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधात लढा दिला जात होता. तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यातील नागरिकांची रसद बंद केली होती. वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद केला होता. त्याच बरोबर वैद्यकीय सेवाही बंद केली होती, असे ट्विट माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह केले होते. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पंजशीर तालिबान्यांनी ताब्यात घेतले. यानंतर तालिबानने पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवला.

    Taliban claims complete control of Afghanistan’s Panjshir

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न