विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समलैंगिक विवाहांना परवानगी देता येणार नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर लेस्बियन,गे, बायसेक्शुअल अॅंड ट्रान्सजेंडर (Lesbian, gay, bisexual, and transgender -LGBT) समुदायाला विवाहाचे समान अधिकार देण्याची मागणी करणारे खाजगी विधेयक लोकसभेत सादर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ते सादर केले. Supriya Sule’s private member’s bill to give equal rights to marriage to LGBT community
त्याचा उद्देश एलजीबीटी, LGBT यांच्यासह इतरांना विवाहाच्या संबंधित समान हक्क मिळावेत, असा असल्याचा सुळे यांनी सांगितले. आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली भारतीय दंड संहितेतील सेक्शन ३७७ काढून टाकले. या निर्णयामुळे समलिंगी व्यक्तींना कायदेशीर मान्यता मिळाली.
आता समलिंगी विवाहांना देखील कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी सुळे यांनी संसदेला केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा प्रकारचा निर्णय होणे प्रागतिक विकासासाठी गरजेचे होते. समाजात अद्यापही एलजीबीटी समुदायाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विशेष विवाह कायदा १९५४ मध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. यातून समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळू शकेल.
संसदेने तयार केलेले कायदे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये झालेल्या विवाहालाच मान्यता देतात. त्यात कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपामुळे देशातल्या या कायद्यांचे संतुलन बिघडेल, असे केंद्र सरकारने उच्च न्यायालायत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
न्यायालयात आपली भूमिका मांडताना केंद्र सरकारने म्हटले की आपला कायदा, आपली व्यवस्था, समाज आणि मूल्ये ही समलैंगिक विवाहाला मान्यता देत नाहीत. त्यामुळे समलैंगिक विवाहांना परवानगी देता येणार नाही. त्यानंतर सुळे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरला आहे.
Supriya Sule’s private member’s bill to give equal rights to marriage to LGBT community
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai Metro : गुढी उभारण्याच्या दिवशी ठाकरे – पवारांची आपापली राजकीय पायाभरणी!!
- पंकज घाेडेच्या बँक खात्यावर परदेशातून माेठया प्रमाणात रक्कम जमा
- The Kashmir Files : नथुरामची भूमिका करणारे अमोल कोल्हे म्हणतात, “द काश्मीर फाईल्स”मुळे वातावरण बिघडते!!
- शेतीला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल -हर्षवर्धन पाटील
- ED Action : …मग आमच्या मागे ईडी का लागत नाही?; प्रकाश आंबेडकरांचा शिवसेना – राष्ट्रवादीला टोला