विशेष प्रतिनिधी
मुंबई: यावर्षी दिवाळी ४ नोव्हेंबरला येत आहे. भारताच्या निरनिराळया भागात दिवाळी साजरी केली जाते. त्यामागे काही प्रमुख घटना व कारणे आहेत. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आता सुरू झाली आहे. या काळात लोक नवीन चांगले कपडे घालतात व घरांमध्ये आकाशदिवे व रोषणाई करतात. दिवाळी का साजरी केली जाते यामागे एक सोडून ७ कारणे आहेत. आम्ही त्याच घटना व कारणे सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील.
Seven different reasons why we celebrate Diwali
१: रामायणामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षाचा वनवासातून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले. दिवाळी त्यांच्या परत घरी येण्याबद्दल साजरी केली जाते.
२: आणखी एक मोठी परंपरा म्हणजे देवी लक्ष्मी समुद्रमंथनातून बाहेर पडली. देवी लक्ष्मीने विष्णूंना दिवाळीच्या रात्री आपले पती म्हणून स्वीकारले आणि त्या दोघांचा विवाह झाला.
३: महाभारताप्रमाणे कौरवांनी पांडवांना जुगारात हरवून बारा वर्षे वनवासाला पाठवले होते. कार्तिक अमावस्येच्या रात्री पांडव हस्तिनापुरात परत आले.
४: शीख लोकांच्यात गुरुगोविंद सिंग यांना मुघल सम्राट जहांगीरने मुक्त केले. ह्या कारणामुळे दिवाळी साजरी केली जाते.
५: जैन धर्मामध्ये महावीरांच्या निर्वाणाची एनिवर्सरी म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
६: भारतातील काही भागात उदा. गुजरातमधे दिवाळी हा नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केली जाते.
७: कालीमातेने अनेक राक्षसांचा संहार करून जगाला राक्षसांपासून मुक्त केले. पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यात कालीमातेच्या पूजेसाठी दिवाळी साजरी केली जाते.
Seven different reasons why we celebrate Diwali
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव यांना आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत, भाजपच्या मंत्र्यांचा संशय
- केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलव किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
- शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
- मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती
- कॉँग्रेसमध्ये मद्यपान केलेले चालणार, नव्या संविधानात दिली जाणार सवलत