• Download App
    ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, मुलगी मल्लिका दुआ यांनी दिली माहिती, उद्या होणार अंत्यसंस्कार । Senior journalist Vinod Dua passes away, confirms his daughter and actress Mallika Dua

    ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, मुलगी मल्लिका दुआने दिली माहिती, उद्या होणार अंत्यसंस्कार

    Senior journalist Vinod Dua passes away : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. त्यांची कन्या आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मृत्यूची माहिती दिली आहे. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. Senior journalist Vinod Dua passes away, confirms his daughter and actress Mallika Dua


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. त्यांची कन्या आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मृत्यूची माहिती दिली आहे. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

    काही दिवसांपूर्वी विनोद दुआ यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती, त्यानंतर त्यांच्या मुलीने या अफवा फेटाळल्या होत्या. मल्लिकाने सांगितले की, विनोद दुआ यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मल्लिका दुआने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, आमचे निष्काळजी, निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झाले. दिल्लीच्या निर्वासित वसाहतीतून पत्रकारितेच्या शिखरावर पोहोचणारे ते अनोखे जीवन जगले. ते नेहमी सत्य सांगत असत. मल्लिका दुआने लिहिले, आता ते आमच्या आईसोबत म्हणजेच स्वर्गात पत्नीसोबत आहेत. वास्तविक, मल्लिकाच्या आईचे या वर्षीच कोरोनामुळे निधन झाले होते.

    विनोद दुआ आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झाला. दोघांची प्रकृती खूपच खालावली होती. यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनोद दुआ 7 जून रोजी घरी परतले होते. परंतु मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

    Senior journalist Vinod Dua passes away, confirms his daughter and actress Mallika Dua

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार