विशेष प्रतिनिधी
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा करत सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.Samajwadi Party is rotten goods, will not come to power till doomsday, says Yogi Adityanath
बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना योगी आदित्यनाथ मुझफ्फरनगर दंगलीचा उल्लेख करत म्हणाले, 2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगल झाली तेव्हा सचिन आणि गौरव नावाच्या दोन जाट तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हा लखनौचा पोरगा सत्तेत होता, हत्या करवत होता.
मारेकºयांना आश्रय देत होता आणि दंगलखोरांना लखनौला बोलावून त्यांना सन्मानित करत होता. दंगलखोरांविरुद्ध आवाज उठवणाºया भाजप कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात होते. दिल्लीचा पोरगा तेव्हाही तमाशा करत म्हणायचा की, दंगेखोरांवर कठोर कारवाई व्हायला नको.
ते तेव्हाही त्यांचा बचावच करत होते. हे लोक पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. कयामतच्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
Samajwadi Party is rotten goods, will not come to power till doomsday, says Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!
- अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले –क्रिप्टोकरन्सीवरील करामुळे मुंबईचे मोठे नुकसान
- मोठी बातमी : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश