• Download App
    राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये लेक्चर दिले, तेव्हा पाकिस्तानी कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर केले!! Rahul Gandhi shared stage with kamal munir, Pakistani origin cambridge official

    राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये लेक्चर दिले, तेव्हा पाकिस्तानी कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर केले!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिटन दौऱ्यात केंब्रिजमध्ये जेव्हा भारतात लोकशाही नसल्याचे लेक्चर दिले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानी कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर केले होते!! Rahul Gandhi shared stage with kamal munir, Pakistani origin cambridge official

    राहुल गांधींनी भारतातल्या लोकशाही व्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले. 2014 नंतर भारतात लोकशाही उरली नाही. सर्व लोकशाही संस्था फॅसिस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताब्यात घेतल्या. भारतात सरकारच्या निर्णयावर बोलायला बंदी आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकता. पण सरकार विरुद्ध बोलू शकत नाही, असे असहिष्णु वातावरण भारतात पसरले आहे. भारतात दलित, अल्पसंख्यांक दबावाखाली आहेत. भयग्रस्त आहेत, अशी जोरदार भाषणबाजी राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केली.

    त्यावेळी हेच पाकिस्तानी कमाल मुनीर त्यांच्या स्टेजवर होते. कमाल मुनीर सध्या केंब्रिज विद्यापीठाचे प्र कुलगुरू आहेत आणि प्र कुलगुरू या नात्यानेच ते राहुल गांधीं बरोबर स्टेजवर हजर होते. हेच ते कमाल मुनीर आहेत, ज्यांना पाकिस्तानी सरकारने “तमघा ए इम्तियाज” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कमाल मुनीर हे केंब्रिज विद्यापीठाच्या पॉलिसी अँड स्ट्रॅटेजिक अफेअर्स डिपार्टमेंटचे देखील प्रमुख आहेत. याच कमाल मुनीर यांनी मुलाखतकार या स्वरूपात राहुल गांधींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत देखील राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचे तर्कट देऊन बरेच दावे केले होते.

    Rahul Gandhi shared stage with kamal munir, Pakistani origin cambridge official

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा, फिर्यादीने तक्रार मागे घेतली

    Lok Sabha : लोकसभा अध्यक्ष बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; शहा म्हणाले- डोळा मारणारे अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करताहेत

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही