Rahul Gandhi Criticizes Modi Govt : गतवर्षी मोदी सरकारने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सामान्य माणसासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. हळूहळू परिस्थिती पुन्हा रुळावर येऊ लागली की, कोरोनाच्या दुसर्या लाटेने उर्वरित आशा मावळल्या. या कठीण काळातून सर्वसामान्य जात असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा भडका उडाला अन् पेट्रोल-डिझेलचे दर शंभरावर गेले. यावरून आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. Rahul Gandhi Criticizes Modi Govt For Petrol and Diesel Price Hike
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गतवर्षी मोदी सरकारने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सामान्य माणसासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. हळूहळू परिस्थिती पुन्हा रुळावर येऊ लागली की, कोरोनाच्या दुसर्या लाटेने उर्वरित आशा मावळल्या. या कठीण काळातून सर्वसामान्य जात असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा भडका उडाला अन् पेट्रोल-डिझेलचे दर शंभरावर गेले. यावरून आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक वृत्त शेअर केले आहे, त्यानुसार भारत सरकारला आयकरातून 4.69 लाख कोटी रुपये मिळाले आहेत, तर खासगी कंपन्यांनी 4.57 लाख कोटी कॉर्पोरेट कर जमा केला आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील या दोन करांपेक्षा अधिक कर 5.25 लाख कोटी रुपये अबकारी शुल्क आणि व्हॅटच्या रूपात जनतेने भरलेले आहेत. हे आकडेवारी जानेवारी ते मार्च या तिमाहीत वगळता केवळ डिसेंबर 2020 ची आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, कर संकलनात केंद्राने पीएचडी केली आहे.
Rahul Gandhi Criticizes Modi Govt For Petrol and Diesel Price Hike
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्तीसाठी विश्व जागृती दिन संपन्न; १६ लाख लोकांचे समर्थन
- पंजाब काँग्रेसमध्ये घमासान, आमदार पुत्रांना सरकारी नोकरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक नेत्यांनी ठोकले शड्डू
- प्रताप सरनाईक यांच्या उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले – कोण त्रास देतोय ते शोधलं पाहिजे!
- स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, संजय राऊत यांचा सूचक सल्ला
- सोनिया गांधी देश की बहू, गांधींशिवाय देश चालू शकत नाही – शत्रुघ्न सिन्हा