भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे सदावर्तेंनी म्हटले आहे. Pressure from Thackeray government in Bhonga case, now Sharad Pawar should speak
विशेष प्रतिनिधी
पुणे : भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे, असे सदावर्तेंनी म्हटले आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. सदावर्ते म्हणाले, देशाच्या राज्यघटनेने सर्वांनाच धार्मीक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!
अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा? ठाकरे सरकार हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. याप्रकरणी शरद पवार यांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे.
Pressure from Thackeray government in Bhonga case, now Sharad Pawar should speak
महत्वाच्या बातम्या
- भारत वृत्तपत्र स्वातंत्र्यात जगात १५० व्या ठिकाणी, पहिला क्रमांक नॉवेर्चा, तर डेन्मार्क दुसरा
- Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!
- NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!