शारदीय नवरात्रीचा शेवटच्या दिवशी आज देशभरात महानवमी साजरी केली जात आहे, पण यावरूनही गोंधळ आहे. अनेक लोक या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचाही यात सहभाग होता. जेव्हा या नेत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. Politicians including Akhilesh Yadav Wished RamNavmi On Maha Navmi Trolled by Social Users
प्रतिनिधी
नवी दिल्ली : शारदीय नवरात्रीचा शेवटच्या दिवशी आज देशभरात महानवमी साजरी केली जात आहे, पण यावरूनही गोंधळ आहे. अनेक लोक या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचाही यात सहभाग होता. जेव्हा या नेत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले.
उत्तर प्रदेश भाजप नेते देवेंद्र शर्मा यांनीही फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. नंतर त्यांनी महानवमीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु आधीची पोस्ट हटवली नाही.
रामनवमी आणि महानवमी मधील फरक
हिंदू दिनदर्शिकेनुसार रामनवमी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात येते. भगवान रामाचा जन्म याच दिवशी झाला. चैत्र नवरात्रीचा शेवट रामनवमीने होतो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार हा सण मार्च-एप्रिलमध्ये येतो. त्याचवेळी शारदीय नवरात्रीमध्ये महावनमी येते. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ती महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेचा नववा अवतार असल्याचे म्हटले जाते. महानवमीच्या दुसऱ्या दिवशी भगवान रामाने रावधाचा वध केला, जो दसरा किंवा विजया दशमी म्हणून साजरा केला जातो.
Politicians including Akhilesh Yadav Wished RamNavmi On Maha Navmi Trolled by Social Users
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप