• Download App
    पंतप्रधान मोदींचे संतांना आवाहन : दोन शाही स्नान झाले, आता कुंभ प्रतीकात्मकच ठेवावा! । PM Modi appeal to saints to keep Kumbha as symbolic

    पंतप्रधान मोदींचे संतांना आवाहन : दोन शाही स्नान झाले, आता कुंभ प्रतीकात्मकच ठेवावा!

    PM Modi : उत्तराखंडमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि तसेच अनेक साधूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिद्वार कुंभमेळा वेळेआधीच समारोप करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांशी बोलून हे सूचित केले आहे. कोरोना संकटामुळे कुंभ आता प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांना केले आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सर्व संतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूसही केली. त्याचबरोबर त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे. PM Modi’s appeal to saints to keep Kumbha as symbolic


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तराखंडमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि तसेच अनेक साधूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिद्वार कुंभमेळा वेळेआधीच समारोप करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांशी बोलून हे सूचित केले आहे. कोरोना संकटामुळे कुंभ आता प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांना केले आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सर्व संतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूसही केली. त्याचबरोबर त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे.

    पंतप्रधान मोदींनी शनिवारी सकाळी ट्विट केले की, ‘आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी आज फोनवर बोलले. सर्व संतांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य देत आहेत. मी यासाठी संत जगताचे आभार मानतो.’ ते पुढे म्हणाले, ‘दोन शाही स्नान झाले आहेत, कोरोनाच्या संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवले पाहिजे, अशी विनंती मी केली आहे. यामुळे या संकटाविरुद्धच्या लढ्याला बळ येईल.’

    पंतप्रधान मोदींचे ट्विट शेअर करताना जुना आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी ट्विट केले की, ‘आम्ही आदरणीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करतो! जीवनाचे रक्षण करणे हे एक उत्तम पुण्य आहे. माझे धर्मपरायण जनतेला आवाहन आहे की, कोरोनाच्या परिस्थितीत मोठ्या संख्येने स्नान करण्यास येऊ नये. नियम पाळावे.’

    सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या समारोपाची घोषणा करू शकते. कुंभचा कालावधी सरकारने 1 ते 30 एप्रिलदरम्यान केला आहे. कोरोनामुळेच निरंजनी आखाड्याने हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यासंदर्भात 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपविण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुख्यमंत्री तीरथसिंग रावत शुक्रवारी यांनी येथील आतापर्यंतच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार होते, परंतु बैठक झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली आहे. मागच्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण जसजसे वाढले आहे, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. विशेषत: देहरादूनमध्ये वाढती रुग्णसंख्या काळजीत टाकणारी आहे. दिल्ली, यूपीसह काही राज्यांमध्ये करण्यात येत असलेल्या तरतुदी लक्षात घेऊन हा अहवाल तयार केला जात आहे. उद्या हा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार आहे.

    PM Modi’s appeal to saints to keep Kumbha as symbolic

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य