वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध झाला तरी हवाई दलाच्या 3000 जागांसाठी तब्बल 56000 अर्ज आले आहेत. ही योजना मागे घ्यावी यासाठी अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. सुशील कुमार मोदींनी मंगळवारी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले अद्याप सात दिवस बाकी असून आतापर्यंत 56000 अधिक युवकांनी हवाई दलात अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची 5 जुलैही अखेरची तारीख आहे. Overwhelming response from patriotic youth; 56000 applications for firefighters
काय केले ट्विट
तरुणांनी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज करून सरकार आणि तिन्ही सेवांमध्ये अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण, प्राथमिकता आणि वयोमर्यादेत शिथिलता अशा अनेक मुद्द्यांवरील सरकारच्या आश्वासनावरुन होणारे अनेक गैरसमज दूर केले आहे, असे सुशील कुमार मोदींनी ट्वीट केले आहे. तसेच त्यांनी युवकांना आवाहन देखील केले आहे. ते म्हणाले, आता तरुणांनी कोणत्याही गोष्टीत न पडता जास्तीत जास्त संख्येने अग्निवीर बनण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.
Agnipath Scheme : अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी “हे” वाचा!!
आरोपांवर दिले स्पष्टीकरण
५६ हजार अर्जदारांवर विरोधकांनी आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी आरजेडी-काँग्रेसच्या आमदारांनी निदर्शने केली. मेहबूब आलम म्हणाले की, अग्निपथ योजनेवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. अग्निपथ योजनेंतर्गत सुरू झालेल्या भरतीमध्ये एकही विद्यार्थी नाही. ते सर्व भाजप आणि आरएसएस संघाचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजप, आरएसएसचे कार्यकर्ते बेरोजगार आहेत, म्हणून ते या योजनेतून लष्करात जात असल्याचेही त्यांनी सांगितले, या आरोपावर राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.
Overwhelming response from patriotic youth; 56000 applications for firefighters
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत चार मजली इमारत कोसळली : 18 ठार, 15 जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती
- 30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी
- ADR Election Watch Report : राज्यसभेतील 31 टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी खटले, 87 टक्के कोट्यधीश, वाचा सविस्तर…
- राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!