वृत्तसंस्था
गुवाहाटी : देशाचा सरकारी कारभार अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. देशातील नागरिकांची मोजणी करण्यासाठी करण्यात येणारी जनगणनासुद्धा आता डिजिटल पद्धतीने करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आगामी जनगणना ही ई-जनगणना असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. यामुळे जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक होण्यास मदत होईल. तसेच सरकारी योजनांचा लाभ देताना देखील तो योग्य व्यक्तीपर्यंत अचूक पोहोचेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. Online census for the first time
गुवाहटीमधील अमीगाव येथे जनगणना केंद्राचे उद्घाटन करताना शहा यांनी ही घोषणा केली आहे. या ई-जनगणनेचे अनेक फायदे असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. ई-जनगणनेनुसार नोंदणी झाल्यामुळे व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्याचे नाव मतदार यादीत जोडण्यात येणार आहे.तसेच व्यक्तीला आपले नाव आणि पत्ता बदलणे देखील सोपे होणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
ई जनगणनेचे फायदे
- ई-जनगणनेमुळे जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीला देखील जनगणनेसोबत जोडण्यात येणार आहे.
- यामुळे जन्म झालेल्या व्यक्तीचे नाव आपोआप जनगणनेच्या यादीत समाविष्ट होईल.
- तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नाव या यादीतून वगळण्यात येईल. यामुळे भारताची जनगणना सातत्याने अपडेट आणि अद्ययावत होत राहील.
- आगामी जनगणना ही येणा-या 25 वर्षांच्या धोरणांना आकार देणारी असेल, असे शहा यांनी म्हटले आहे. या ई-जनगणनेचे सॉफ्टवेअर लाँच होताच मी आणि माझं कुटुंब सर्वप्रथम ऑनलाईन तपशील भरणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली आहे.
Online census for the first time
महत्वाच्या बातम्या
- NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!
- China Debt Trap : श्रीलंकेत महागाईचा भस्मासूर; सत्तांतरानंतर मोठा हिंसाचार; खासदाराचा मृत्यू
- शाहीनबाग : “कागज नही दिखायेंगे” प्रवृत्तीचे संविधानाचे पांघरूण; झुंडशाहीचे वर्तन!!
- कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला