वृत्तसंस्था
बेंगळूरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना बी. एस. येडियुरपप्पांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कुणीही दबाव आणलेला नाही, तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी मी कोणाचेही नाव सुचवलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.Nobody pressurised me to resign. I did it on my own so that someone else can take over as CM after completion of 2 years of govt.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येडियुरप्पा यांनी काही अटी – शर्तींवर मुख्यमंत्रिपद सोडले आहे अशा बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. त्यांनी आपल्यानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला काही नावे सूचविल्याचेही बातमीत म्हटले होते. परंतु ही बातमी येडियुरप्पांनी फेटाळून लावली.
दोन वर्ष कर्नाटकचा मुख्यमंत्री पदावर मी समाधानकारक काम केले. आता नव्या मुख्यमंत्र्यांना सूत्रे घेणे शक्य व्हावे यासाठी मी राजीनामा दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे देखील कर्नाटकात राहूनच भाजपचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील आहेत. चार दिवसांपूर्वी लिंगायत समाजातील 30 मठाधिपती यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला होता. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर टिकून राहावेत यासाठी हा दबाव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आणण्याचा प्रकार होता. परंतु असा कोणताही दबाव कामी येऊ शकला नाही. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर राजीनाम्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचा खुलासा केला आहे.
त्याच वेळी नवा मुख्यमंत्री आपल्या गटाचा किंवा आपल्या समाजातील असावा अशी अपेक्षा त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाही. उलट आपण कोणाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ कर्नाटकात नवीन मांडणीमध्ये त्यांची भूमिका मर्यादित करून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.
Nobody pressurised me to resign. I did it on my own so that someone else can take over as CM after completion of 2 years of govt.
महत्त्वाच्या बातम्या
- चौकशीच्या दरम्यान पोलीसांसमोर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी, नवरा राज कुंद्रासोबत झाला जोरदार वाद
- ममता सरकारने पुन्हा काढली खोडली, राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा घेतला निर्णय
- आत्ता पूरग्रस्तांना तातडीची मदत द्या, परंतु पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करा; फडणवीसांचे प्रतिपादन
- राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका