• Download App
    देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह Nitish Kumar will meet PM modi tomarrow

    देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – देशात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. Nitish Kumar will meet PM modi tomarrow

    जातीनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले, “हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा तरी जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. हे केवळ बिहारचे मत नाहीये, तर संपूर्ण देशाचे मत आहे. त्यामुळे उद्या पंतप्रधानांसमोर मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

    जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला नाही, तर राज्यात स्वतंत्रपणे तशी जनगणना करण्याचा विचार केला जाईल, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, पंतप्रधान याबाबत सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



    जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी नितीशकुमार उद्या पंतप्रधानांना भेटणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये मंत्री विजय चौधरी, जनक राम, ‘हम’चे अध्यक्ष जीतनराम मांझी, ‘व्हीआयपी’चे अध्यक्ष मुकेश साहनी हेही असतील. त्यांच्याबरोबर तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही असतील. काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांचाही समावेश या शिष्टमंडळात असणार आहे.

    Nitish Kumar will meet PM modi tomarrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!