• Download App
    आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे, कोरोनामुळे वाढलेल्या संकटावर नीती आयोगाचा सल्ला । Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home

    आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे, कोरोनामुळे वाढलेल्या संकटावर नीती आयोगाचा सल्ला

    Niti Aayog Member Dr VK Paul : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्‍या खोलीत ठेवावे. Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्‍या खोलीत ठेवावे.

    डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, या महामारीला पराभूत करण्यासाठी आपल्याला लसीकरण गतीने पुढे न्यायाचे आहे. लसीकरणाची गती कमी करून चालणार नाही. ते म्हणाले की, या कोरोना परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने अनावश्यक बाहेर फिरू नये. कुटुंबासमवेत असतानाही मास्क घालावा. ते म्हणाले की, मास्क घालणे फार महत्त्वाचे आहे. फारच निकडचे नसेल तर इतरांना आपल्या घरीही बोलावू नका.

    महिलांना पीरियडदरम्यानही लस दिली जाऊ शकते

    डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, या भयंकर उद्रेकादरम्यान आपण कोरोना लसीकरणाची गती कमी करू शकत नाही. खरं तर लसीकरण मोहीम वेगाने वाढवली पाहिजे. यासह त्यांनी असेही म्हटले की, या लसी महिला मासिक पाळीच्या दरम्यान घेऊ शकतात. केवळ त्यामुळे लस घेणे पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नाही.

    Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर : काश्मीर प्रश्नावर भारताची रोखठोक भूमिका; पाकिस्तानने PoK रिकामा करावा, तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नको

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर