वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्नाटकातील नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्राविरोधात आघाडी उघडली आहे. खोऱ्यात कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी करत त्यांनी मोठी घोषणाही केली. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा यांनी खोऱ्यात कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. Mehbooba Mufti’s announcement, will not contest elections until Article 370 is returned;
यावेळी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांचाही उल्लेख केला. या एजन्सींच्या बळावर तुमची ताकद सरकारला पराभूत करू शकते हे कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या. दिल्लीसंदर्भात केंद्राने आणलेल्या अध्यादेशावरही मेहबुबा यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, हा सर्वांसाठी वेक अप कॉल आहे, कारण हे देशात कुठेही होऊ शकते.
दिल्लीत जे घडले ते कुठेही होऊ शकते – मेहबुबा
जम्मू आणि काश्मीर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातून भाजप सरकारला हटवल्याबद्दल राज्यातील लोकांचे कौतुक केले. रविवारी तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिल्लीतील अलीकडच्या घडामोडींचा उल्लेख करताना सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले. दिल्लीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाबाबत त्या म्हणाल्या की, हे संपूर्ण देशाला जाग आणणारे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे घडले ते संपूर्ण देशात होणार आहे.
भाजपला विरोधक नको – पीडीपी प्रमुख
पुढे बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजपला विरोधक नको आहेत. दिल्ली सरकार हतबल झाले आहे. ते प्रत्येकाला होणार आहे. कर्नाटक निवडणूक लढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपमधील प्रत्येकाने धर्माचा वापर केला, तरीही लोकांनी त्यांना मतदान केले, असा आरोप त्यांनी केला.
Mehbooba Mufti’s announcement, will not contest elections until Article 370 is returned;
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क