• Download App
    मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले |Maneka Gandhi Varun Gandhi waited outside the BJP ??; Excluded from the National Executive

    मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले

    वृत्तसंस्था

     नवी दिल्ली : माजी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या मेनका गांधी आणि त्यांचे खासदार पुत्र वरूण गांधी गांधी यांनी भाजपपेक्षा वेगळी वाट पकडल्याचे स्पष्ट होत आहे.Maneka Gandhi Varun Gandhi waited outside the BJP ??; Excluded from the National Executive

    भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी 81 जणांची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यामध्ये मेनका गांधी आणि वरूण गांधी यांची नावे नाहीत. येत्या 18 ऑक्टोबरला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा होऊन त्यामध्ये काही निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.



    मात्र या बैठकीत मेनका गांधी आणि वरून गांधी यांना निमंत्रण नसल्याने त्यांची राजकीय वाट भाजपपासून हळूहळू वेगळी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर या राजकीय निर्णयाचा नेमका काय परिणाम होईल हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

    लखीमपूर संघटनेच्या त्यावरून वरुण गांधी यांनी भाजपा पेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे माध्यमांनी मांडले आहे. त्याचा राजकीय परिणाम म्हणून मेनका गांधी आणि वरूण गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारणीतून वगैरे असे वगळल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. परंतु त्या आधीपासूनच या माता – पुत्रांनी भाजपपासून वेगळी वाट पकडल्याचे अनेक संकेत दिले होते. त्याकडे मात्र माध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे

    Maneka Gandhi Varun Gandhi waited outside the BJP ??; Excluded from the National Executive+

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन