• Download App
    आता पदोन्नतीशिवाय निवृत्त व्हावे लागणार नाही, पोलिसांमध्ये पदोन्नतीचे नवीन धोरण ठाकरे सरकारने केले मंजूरMaharashtra Thackeray government Approves new policy for promotion in police

    आता पदोन्नतीशिवाय निवृत्त व्हावे लागणार नाही, पोलिसांमध्ये पदोन्नतीचे नवीन धोरण ठाकरे सरकारने केले मंजूर

    महाराष्ट्र सरकारने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पोलिसांमध्ये पदोन्नतीच्या या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे.Maharashtra Thackeray government Approves new policy for promotion in police


    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पोलिसांमध्ये पदोन्नतीच्या या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे हवालदार आणि इतर श्रेणीतील 45,000 जवानांना फायदा होईल. राज्य सरकारने गुरुवारी सांगितले, “पूर्वी एक कॉन्स्टेबल त्याच्या संपूर्ण कार्यकाळात समान पदावर असायचा. पदोन्नती धोरणामुळे हवालदारांची संख्या 37,861 वरून 51,210 होईल.



    आतापर्यंत पदोन्नतीशिवाय व्हायचे निवृत्त

    सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस सहायक उपनिरीक्षकांची संख्या 15,270 वरून 17,071 पर्यंत वाढेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका कर्मचाऱ्याला 10 वर्षे एकाच पदावर सेवा दिल्यानंतर पदोन्नती मिळावी अशी अपेक्षा आहे, परंतु उच्च पदांच्या कमतरतेमुळे, कर्मचारी एकही पदोन्नती न घेता निवृत्त होत असे. आता हे धोरण लागू झाल्यानंतर दलाचे मनोबल वाढेल आणि त्यांची कार्यक्षमताही वाढेल.

    अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक भत्ता देण्याची घोषणा

    त्याचबरोबर ठाकरे सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षणासाठी विशेष मासिक भत्ता दिला जाईल. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण भत्ता जाहीर केला आहे. अल्पसंख्याक विकास विभाग वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 3000-3500 रुपये देईल. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या विशेष पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात लाभ मिळणार आहे.

    ज्या विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागत आहे, त्यांना ही रक्कम नक्कीच कुठेतरी मदत करेल. वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार आता दरमहा 3 हजार ते 3500 रुपये देणार आहे. ही रक्कम राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

    Maharashtra Thackeray government Approves new policy for promotion in police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार