• Download App
    मद्रास हायकोर्टाचा निकाल : पत्नीने मंगळसूत्र काढणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता! Madras High Court Verdict: Removal of mangalsutra by wife is mental cruelty to husband

    मद्रास हायकोर्टाचा निकाल : पत्नीने मंगळसूत्र काढणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : एखाद्या व्यक्तीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज देखील मंजूर केला आहे. Madras High Court Verdict: Removal of mangalsutra by wife is mental cruelty to husband

    न्यायालयाने काय सांगितले?

    न्यायमूर्ती व्ही. एम. वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकाकर्त्याला अनुमती देताना आणि यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण मंगळसूत्र बनले असून यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने पतीची याचिका मंजूर केली आहे. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.


    जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय


     

    – महिलेची बाजू

    या प्रकरणी महिलेची चौकशी केली असता तिने कबूल केले की विभक्त होण्याच्या वेळी तिने तिचे मंगळसूत्र म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती, आणि नंतर ती काढून टाकली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली असून यानंतर मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा हवाला देऊन सांगितले की, महिलेने मंगळसूत्र घालणे आवश्यक नाही आणि त्यामुळे पत्नीने ते काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा युक्तिवाद या महिलेच्या वकिलांनी केला.

    Madras High Court Verdict: Removal of mangalsutra by wife is mental cruelty to husband

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?