पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर भारतीय किसान संघानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Long-term losses due to these so-called farmers stubbornness, reaction of Bhartiy Kisan Union after repeal of three farm laws
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर भारतीय किसान संघानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतीय किसान संघाने एका निवेदनाद्वारे म्हटले की, तिन्ही कृषी कायदे परत घेण्याचा सरकारचा हा निर्णय अनावश्यक वाद टाळण्यासाठी ठीक आहे. हे तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान करणारे आहे. या कायद्यांत सुधारणा केल्याने शेतकऱ्यांना, खासकरून छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना जास्त लाभ झाला असता.
त्यांनी पुढे म्हटले की, माननीय पंतप्रधानांनी किमान आधारभूत किंमत आणखी प्रभावी करण्याविषयी सांगितले आहे. आणि यासाठी एक समिती स्थापन करण्याचाही उल्लेख केला आहे. भारतीय किसान संघ याचे स्वागत करण्यासोबतच यात देशाच्या अराजकीय संघटनांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्याचाही आग्रह करते.
भारतीय किसान संघानुसार शेतकऱ्याची खरी समस्या म्हणजे त्यांचे बाजारात होणारे शोषण आहे. यावर उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य देण्याचा कायदा करून गॅरंटीदेण्याीच गरज आहे.
Long-term losses due to these so-called farmers stubbornness, reaction of Bhartiy Kisan Union after repeal of three farm laws
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी