Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष आता 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC
प्रतिनिधी
लखनऊ : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष आता 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.
सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितले की, आशिष मिश्राला 3 दिवसांच्या पोलीस कोठडीवर पाठवण्यात आले आहे. फिर्यादींनी 14 दिवसांची मागणी केली होती, परंतु तीन दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अटींसह 12 वी ते 15 वीपर्यंत रिमांड असेल. यादरम्यान वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्रास दिला जाणार नाही. त्यांचे वकील लांब उभे राहून बोलू शकतात.
याआधी आशिषचे वकील अवधेश सिंह म्हणाले की, एसआयटीने 40 प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले होते, पण आशिषला हजारो प्रश्न विचारले गेले. आता काय विचारायचे बाकी आहे, ज्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे? तुमच्याकडे आणखी काही प्रश्नांची यादी असल्यास ती दाखवा. आशिषने तपास अधिकाऱ्यापुढे कलम 161 अन्वये आधीच निवेदन नोंदवले आहे. असे असले तरी पोलिसांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, आशिषने तपासात सहकार्य केले नाही. अवधेश म्हणाले की, एसआयटीने सांगावे की त्यांना कोठडी का हवी आहे, त्यांना आशिषला कुठे न्यायचे आहे? त्याचबरोबर फिर्यादी वकिलांनी सांगितले की, तपास पथकाला अनेक प्रश्न विचारायचे होते, पण आशिषने 12 तासांत फक्त 40 प्रश्नांची उत्तरे दिली.
लखीमपूर खेरीमध्ये आठ जणांचा मृत्यू
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला 12 तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री लखीमपूरमध्ये अटक करण्यात आली होती. दुसरीकडे, महाराष्ट्रात लखीमपूर हिंसाचाराचा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे.
Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC
महत्त्वाच्या बातम्या
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर मेहबुबा मुफ्तींचे शाहरुखला समर्थन, म्हणाल्या – शाहरुख जर ‘खान’ नसता तर इतका अडचणीत आला नसता!
- अगोदरच कोरोनाने व्यापार ठप्प, आता पुन्हा बंदची नाटके कशाला; वर्ध्यात मोर्चेकरी, व्यापाऱ्यांत राडा
- संरक्षण क्षेत्रात विजया दशमीला नवी झेप; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापणार; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स
- स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री : अमृत कौर, चॅम्पियन ऑफ वुमन राइट्स!
- भंडाऱ्यात काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापार्यांचा विरोध; दुकाने १०० टक्के खुली