विशेष प्रतिनिधी
पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल यांनी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर अवैध पैसे वसुलाचा आरोप केला आहे. यावरून बिहारमधील ‘जेडीयू’ व भाजपच्या आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याचे लक्षात येत आहे.JDU accuses Bihar Dy Cm
अवैध वसुली करणे हे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे कामच आहे. ते जेथे जातात तेथून नोटांची बंडलेच घेऊन परततात, असा आरोप मंडल यांनी जाहीररीत्या केला आहे. प्रसाद यांनी नुकताच भागलपूरचा दौरा केला होता. ‘‘ते अनेकदा हा दौरा करतात. केवळ पैसे वसुलीसाठी ते भागलपूरला जातात.
तेथे लोकशाही जनता दलाचे आमदार राजेश वर्मा यांच्या घरी प्रसाद हे भोजनासाठी गेले होते, याचा उल्लेख करीत मंडल म्हणाले की, वर्मा यांचा सोन्याचा व्यापार असल्याने त्यांनी सोन्यााच्या राशी उपमुख्यमंत्र्यांना दिल्या असतील. बिहारचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जायस्वाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. अशा निराधार आरोपांमुळे सत्ताधारी पक्षांच्या आघाडीवर परिणाम होईल, असे ते म्हणाले.
JDU accuses Bihar Dy Cm
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया