• Download App
    इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले.....Indurikar Maharaj started raising awareness about corona vaccine from Jalna district; Said .....

    इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..

     

    ”मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही.” इंदुरीकर महाराजांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.Indurikar Maharaj started raising awareness about corona vaccine from Jalna district; Said …..


    विशेष प्रतिनिधी

    जालना : मागील काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराज म्हणाले होते की , ”मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही.”त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.

    दरम्यान आता इंदोरीकर महाराजांनी जालन्यातून कोरोना जनजागृतीला सुरुवात केली आहे.याच कारण म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जालन्यात इंदुरीकर महाराजांची भेट घेतली.या भेटीत टोपेंनी लशीबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन केले आहे.

    कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे. जालना जिल्ह्यातूनच त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

    तसेच महाराजांनी इंदोरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या,कोरोना तणावमुक्त करा, अस आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात ही केली. त्यामुळे टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    Indurikar Maharaj started raising awareness about corona vaccine from Jalna district; Said …..

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन