• Download App
    भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर, प्रवासी ब्रिटिशांसाठी नवे नियम, लस घेतलेली असूनही कोरोना चाचणी आणि क्वारंटाइन बंधनकारक । India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport

    भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर, प्रवासी ब्रिटिशांसाठी नवे नियम, लस घेतलेली असूनही कोरोना चाचणी आणि क्वारंटाइन बंधनकारक

    India new travel rules for uk nationals : ब्रिटनच्या कोरोना प्रवासाचे नियम पाहता आता भारतानेही यूकेच्या नागरिकांसाठी नवीन प्रवास नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, लस घेतल्यानंतरही ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर कोरोना चाचणी करावी लागेल. याशिवाय भारतात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणात राहणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटनच्या कोरोना प्रवासाचे नियम पाहता आता भारतानेही यूकेच्या नागरिकांसाठी नवीन प्रवास नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, लस घेतल्यानंतरही ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर कोरोना चाचणी करावी लागेल. याशिवाय भारतात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणात राहणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.

    वृत्तसंस्थेनुसार, हे नवीन प्रवासी नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. यूकेमधून येणाऱ्या यूकेच्या सर्व नागरिकांना लागू होतील. या नवीन नियमांनुसार, ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. ब्रिटिश नागरिकांना कोणतीही लस देण्यात आलेली असली तरी आरटीपीसीआर चाचणी करूनच त्यांना यावे लागेल. यानंतर मग भारतातही चाचण्या कराव्या लागतील. याशिवाय 10 दिवसांच्या विलगीरणातही राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

    यापूर्वी, ब्रिटननेही प्रवासी भारतीय नागरिकांना अशाच प्रक्रियेतून जावे लागणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर भारताने ब्रिटनला ही नवी नियमावली जारी करून जशास तसे उत्तर दिले आहे.

    India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!