विशेष प्रतिनिधी
पाटणा – शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत रामायण, महाभारत महाकाव्यांचा समावेश करावा अशी मागणी बिहारमधील भाजपचे मंत्री नीरजकुमारसिंह बबलू यांनी केली आहे.Include Ramayana, Mahabharata in syalabus demands BJP minister
ते म्हणाले मध्य प्रदेशच्या उदाहरणाचा कित्ता बिहारने गिरवावा. अभ्यासक्रमाची आखणी तज्ज्ञांची समिती करते, पण मुलांना देशाच्या संस्कृती, परंपरेची माहिती असलीच पाहिजे असे माझे ठाम मत आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे. बबलू यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तरुण पिढीत देशाचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण होईल. धार्मिक पुस्तके वाचण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे रामायण, महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास मुलांना फायदा होईल.
भाजपचे प्रतिनिधित्व करणारे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितले की, तरुण पिढीला देशाची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देण्याची गरज आहे. मी काही शिक्षण मंत्री नाही, पण ही माहिती प्रत्येकाला असलीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात महाभारत आणि गीता असते, जो आपल्या देशाचा इतिहास आहे.
Include Ramayana, Mahabharata in syalabus demands BJP minister
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याचा आसूड घेऊन रस्त्यावरून उतरा; गोपीचंद पडळकरांचा युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा
- NO VACCINE NO ENTRY : अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री ; फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा;फोटो व्हायरल
- PROUD NEWS : पाकिस्तानात पहिली हिंदू महिला अधिकारी; सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात CSS परीक्षा पास
- अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी ‘ईडी’ने कंबर कसली; सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी मनी लॉड्रिंग व्यवहाराचा कसून तपास करणार