वृत्तसंस्था
दिसपूर : आसाममध्ये दोन पेक्षा जास्त अपत्यं असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केली. In Assam if there are more than two children Benefit of government schemes closed; CM’s announcement
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, “राज्यातील काही अशा योजना आहेत की ज्याच्या लाभासाठी आम्ही दोन अपत्यांची अट घालू शकतो. पंतप्रधान आवास योजना, शाळा, महाविद्यालय तसेच इतर ठिकाणचे प्रवेश असतील अशा प्रकारच्या राज्याच्या हातातील योजनांमध्ये दोन अपत्यांची अट असेल. त्यानंतर हळूहळू राज्यातील सर्व योजनांसाठी ही अट लागू करण्यात येईल.”
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीन जिल्ह्यांतील अल्पसंख्यांकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंबंधी काही सूचना दिल्या होत्या. या जिल्ह्यांतील लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘सभ्य परिवार नियोजन निती’ लागू करण्याचा आग्रह धरला होता. या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांतील आणि बांग्लादेशातील मुस्लिम मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत असल्याने समस्या निर्माण होत आहेत अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती.
आसाममध्ये पंचायतीच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान शैक्षणिक योग्यता आणि शौचालयाची आवश्यकता तसेच कमाल दोनच अपत्यांची अट घातली आहे.
In Assam if there are more than two children Benefit of government schemes closed; CM’s announcement
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Cases : ८१ दिवसांनंतर २४ तासांत ६० हजारांहून कमी रुग्णांची नोंद, १५७६ जणांचा मृत्यू
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या 5 पोलिसांचं निलंबन मागे, खोतकरांनी गृहमंत्र्यांकडे केली होती मागणी
- सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करणार
- संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड
- इराणच्या अध्यक्षपधी अमेरिकाविरोधी कट्टरतावादी रईसी यांची निवड