विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला गेला. चार महिन्यांत भाजपचे चार आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहे. यावर भाजपाचे कूचबिहार दक्षिणचे आमदार निखिल रंजन डे यांनी म्हटले आहे की तृणमूल नेत्यांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेणे ही वरिष्ठ नेत्यांची चूक झाली आहे.If Trinamool leaders had not been included in BJP, it would have been a good performance, senior leaders made a mistake, BJP MLA laments
त्यांना पक्षात घेतले नसते तर पक्षाची कामगिरी चांगली झाली असती.निखिल डे म्हणाले तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन नेत्यांनी चूक केली. बाहेरून आलेले हे नेते कधीही भाजपाच्या विचारसरणीशी एकरुप झाले नव्हते. भाजपच सत्तेवर येईल असा समज झाल्यानचे ते पक्षात आले होते. आमच्या पक्षाने त्यांना खूप महत्त्व दिले होते. आता ते निघून जात आहेत.
भाजपचे उपाध्यक्ष मुकुल रॉय भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी मे महिन्यात तृणमूलमध्ये परतले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे आणखी तीन आमदार तृणमूलमध्ये गेले आहेत. .
डे यांच्यावर टीका करताना तृणमूल कॉँग्रेसचे कूचबिहारचे जिल्हाध्यक्ष पार्थ प्रतिमा रॉय म्हणाले,
त्यांच्या तर्काने विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे देखील भाजपच्या विचारसरणीशी एकरूप झालेले नाहीत. कारण ते एक वषार्पूर्वी तृणमूलसोबत होते.
If Trinamool leaders had not been included in BJP, it would have been a good performance, senior leaders made a mistake, BJP MLA laments
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तिसरी लाट येणार नाही, आधीच आली आहे!’, गणेश चतुर्थीला होणाऱ्या गर्दीवर मुंबईच्या महापौर पेडणेकर यांचा इशारा
- Pegasus Case : पेगासस प्रकरणावर उत्तर देण्यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टाला मागितला वेळ, सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत तहकूब
- हॉकीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार, इतर खेळांवरही खर्च करण्याची होती मागणी
- Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना