मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले. ते म्हणाले- कोणी शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधतात, कोणी त्याला जीवनदाता म्हणून संबोधतात, पण मला कोणी विचारले तर मी म्हणेन की आपल्या देशाचा शेतकरी अन्नदाता आहे, जीवनदाता आहे तसेच या भारताचा भाग्यविधाता आहे. Hungami Hindus appear as soon as the elections come Rajnath Singh without naming Priyanka
कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत संरक्षण मंत्री म्हणाले – काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाच हमीभावांबद्दल बोलत आहे. कमलनाथ सरकार असताना अनेक घोषणा झाल्या पण पहिले आश्वासन पूर्ण झाले नाही. आता पुन्हा हमीभावाची चर्चा आहे.
प्रियांकाचे नाव न घेता साधला निशाणा –
राजनाथ सिंह म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की, तुम्हाला अनेक ‘’हंगामी हिंदू’’ दिसू लागतात. आजकाल कधी बजरंगबली तर कधी माँ नर्मदेची आरती होत आहे. नर्मदेचा आदर तर शिवराज चौहान यांनी केला आहे. त्यांनी मध्यप्रदेश विधानसभेत नर्मदेला living entity रुपात मान्यता दिली होती.
Hungami Hindus appear as soon as the elections come Rajnath Singh without naming Priyanka
महत्वाच्या बातम्या
- जम्मू काश्मीर : कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू
- कोण बडा हिंदुत्ववादी आणि हिंदू भक्त यावरच भाजप काँग्रेसमध्ये संघर्ष, अन्य धर्मियांची उपेक्षा; मायावतींचे बऱ्याच दिवसांनी टीकास्त्र
- शिवसेना – भाजप युतीमध्ये देवेंद्र फडवणीस आमचे नेते!!; शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला
- चिनी माओवादी सरकारने भारतीय पत्रकारांना चीन मधून हाकलले तरी भारतातल्या लिबरल गँगचे हू की चू नाही!!