विशेष प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्वात “हर घर तिरंगा” अभियानाची आज 13 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. देशातील कोट्यावधी नागरिकांनी आपल्या घराघरांवर तिरंगी ध्वज डौलाने फडकवले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या घरावर ध्वज फडकावला. त्याचबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप पर्यंत कोट्यावधी नागरिकांनी या अभियानाला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम धुमधडाक्यात सुरू झाले आहेत.
Har Ghar Tiranga campaign started with great enthusiasm across the country