• Download App
    आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; 19 लाख लोकांना झळ; पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन|Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister's assurance of help

    आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; 19 लाख लोकांना झळ; पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणचे हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुरामुळे तब्बल 19 लाख लोक बाधित झाले आहेत. या लोकांना होत असलेल्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त करून आसामला मदतीचे आश्वासन देखील दिले आहे.Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help



    पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता 

    आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे.

     54 लोकांचा मृत्यू

    राज्यातील 35 जिल्ह्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांतील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, घरे पाण्याखाली जात आहेत.

    Floods disrupt life in Assam; 19 lakh people affected; Prime Minister’s assurance of help

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!