विशेष प्रतिनिधी
पाटणा – गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बिहारची राजधानी पाटणामध्ये जवळपास तीन लाख लोकांना फटका बसला आहे. पुरामुळे ४३ गावांमधील जनजीवन पूर्ण विस्कळित झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.Flood worsens in Bihar
मुसळधार पावसामुळे गंगा नदीने धोक्याची पातळी ९ ऑगस्टलाच ओलांडली होती. पाटणा शहरात या पुराचे पाणी येऊ नये म्हणून येथील फराक्का बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दानापूर, मानेर आणि बख्तीयारपूर या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नागरिकांच्या बचावासाठी २५९ लहान बोटींद्वारे स्थानिकांना येथून बाहेर काढण्यात येत आहे. त्यांनतर मदत शिबिरांमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जात असून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना अन्न पुरवले जात आहे.विशेष म्हणजे पूरस्थितीतही लसीकरणाचे काम केले जात आहे. पूरग्रस्त भागात आरोग्य कर्मचारी बोटींनी जात नागरिकांचे लसीकरण करत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
Flood worsens in Bihar
महत्त्वाच्या बातम्या
- विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा अखेर लिलाव, हैदराबादच्या ‘सॅटर्न रियल्टर्स’कडून ५२.२५ कोटीत खरेदी
- गोवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधासाठी आगीत ओतले तेल, मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने केले झेंडावंदन
- दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीपर अभ्यासक्रम, मुख्यमंत्री केजरीवाल
- महाराष्ट्रात डेल्या प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण