• Download App
    बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका|Flood worsens in Bihar

    बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बिहारची राजधानी पाटणामध्ये जवळपास तीन लाख लोकांना फटका बसला आहे. पुरामुळे ४३ गावांमधील जनजीवन पूर्ण विस्कळित झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.Flood worsens in Bihar

    मुसळधार पावसामुळे गंगा नदीने धोक्याची पातळी ९ ऑगस्टलाच ओलांडली होती. पाटणा शहरात या पुराचे पाणी येऊ नये म्हणून येथील फराक्का बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दानापूर, मानेर आणि बख्तीयारपूर या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.



    नागरिकांच्या बचावासाठी २५९ लहान बोटींद्वारे स्थानिकांना येथून बाहेर काढण्यात येत आहे. त्यांनतर मदत शिबिरांमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जात असून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना अन्न पुरवले जात आहे.विशेष म्हणजे पूरस्थितीतही लसीकरणाचे काम केले जात आहे. पूरग्रस्त भागात आरोग्य कर्मचारी बोटींनी जात नागरिकांचे लसीकरण करत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

    Flood worsens in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chandrachud : वन नेशन-वन इलेक्शन विधेयक संविधानाविरुद्ध नाही; चंद्रचूड यांनी संसदीय समितीला सांगितले- ECच्या अधिकारांवर चर्चेची गरज

    Gurugram : गुरुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडूची हत्या; अकादमी चालवल्याच्या रागातून वडिलांनी झाडल्या गोळ्या

    Bhagwant Mann : भगवंत मान यांची पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका, परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आक्षेप