’आझमगडसारख्या जिल्ह्याच्या नावाला पूर्वी लोक घाबरायचे. मात्र आज… असंही योगींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : देशभरात रमजान महिना संपल्यानिमित्त शनिवारी ईद साजरी केली गेली. ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी दिल्लीच्या जामा मशिदीसह अन्य अन्य मशिदींमध्ये नमाज अदा केली आणि गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, या ईदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक विधान समोर आले आहे. Eid Namaz is not held on the roads in Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath statement
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ‘’उत्तर प्रदेशाही ईदची नमाज अदा केली जात आहे, मात्र कुठेही रस्त्यांवर नमाज पठण होत नाहीए आणि कोणत्याही मार्गाची वाहतूकही बंद नाही. कारण, सर्वांना माहीत आहे की इथे कायद्याचे राज्य आहे आणि ते सर्वांसाठी समान आहे.’’
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या 24 व्या राष्ट्रीय परिषदेला हजेरी लावली. ते पुढे म्हणाले की, ‘’आझमगडसारख्या जिल्ह्याच्या नावाला पूर्वी लोक घाबरायचे. मात्र आज आझमगड एक्स्प्रेसही आज महामार्गाशी जोडली गेली आहे, आझमगड जिल्ह्यात विमानतळही बांधले जात आहे. आझमगडमध्ये एक विद्यापीठही बांधले जात आहे. आज कोणतीही भीती नाही, कोणत्याही प्रकारची अराजकता नाही.’’
Eid Namaz is not held on the roads in Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath statement
महत्वाच्या बातम्या
- ISRO : अंतराळात वाढला भारताचा दबदबा! ‘इस्रो’ने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह
- सत्तेचा नाही अजून पत्ता तरी मुख्यमंत्रीपदाची वाढली स्पर्धा; महाराष्ट्र – कर्नाटकात सारखाच कित्ता!!
- …अन् राहुल गांधींना सोडावं लागलं दोन दशकांपासून राहत असलेलं शासकीय निवास्थान!
- पुण्यात वरिष्ठ गटाच्या सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ