• Download App
    तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त |Drugs worth Rs 2,160 crore seized in three years

    तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते. गुजरात एटीएसने रविवारी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ७३पाकिस्तानी नागरिकांनाही तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. Drugs worth Rs 2,160 crore seized in three years

    एटीएसने दावा केला आहे की पाकिस्तानी तस्करांनी गुजरात किनारपट्टीचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले.



    २०२१ मध्ये १,४६६.१८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुजरात एटीएसने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, २०२१ मध्ये केवळ १,४६६.१८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर गेल्या दोन वर्षांत ७०४.४ कोटी रुपयांचे नशिले पदार्थ, औषधे जप्त करण्यात आली होती.

    या आकडेवारीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून २१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीचा समावेश नाही. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे.

    रिलीझमध्ये म्हटले आहे की, २०१९-२०२१ दरम्यान, राज्य एटीएसने ४२७.३ किलो हेरॉइन,६.६५ किलो एमडी आणि ३.५४ किलो ब्राऊन शुगर जप्त केली आहे.

    Drugs worth Rs 2,160 crore seized in three years

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप