वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली-मेरठ या महामार्गाची दिल्लीच्या सीमेवरील भागाची अवस्था गेल्या १० महिन्यांत वाईट झाली आहे. या टप्प्यातील दुरूस्ती त्वरित न केल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळे त्याच्या दुरूस्तीसाठी हा मार्ग मोकळा करावा,’ असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेले १० महिने दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. Delhi – Merat High way will clear fastly
हरियानातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर धडक दिली. गेले १० महिने हे आंदोलन सुरू असल्याने गाझीपूर येथे एक नवे गावच वसल्याचे चित्र दिसत आहे. दिल्ली- मेरठ महामार्गावरच गाझीपूर टप्प्यात अनेक तंबू व नवीन तात्पुरती बांधकामेही झाली आहे. राकेश टिकैत यांनी मध्यंतरी येथे फुलझाडे लावण्याचा प्रयोगही केला होता. रस्त्यावरच जंगली झुडपे उगवली आहेत, खड्यांचे साम्राज्य झाले आहे. येथील पथदिवे बंद आहेत, कारण त्यांची वीज शेतकऱ्यांनी आपल्या वातानुकूलीत यंत्रांसाठी वापरण्यास सुरवात केली आहे.
Delhi – Merat High way will clear fastly
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं