• Download App
    सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ!, वर्षात खासगी बँकांच्या ग्राहकांना मोठा फटका; १.३८ लाख कोटी गमावले cyber Crime increase in India; 1.38 lakh crore lotted

    सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ!, वर्षात खासगी बँकांच्या ग्राहकांना मोठा फटका; १.३८ लाख कोटी गमावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात वर्षभरात सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्या अंतर्गत खासगी बँक ग्राहकांनी १.३८ लाख कोटी गमावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. cyber Crime increase in India; 1.38 lakh crore lotted

    वैयक्तिक माहिती घेतल्यावर ही ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला आपल्या बँकेचा तपशील देऊ नका. शिवाय आलेला ओटीपी कधीही शेअर करू नका. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार रोज नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. हे टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल जागरुक राहावे लागेल. तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. RBI ने सांगितले आहे की गेल्या वर्षी खासगी बँकांच्या ग्राहकांशी १.३८ टलाख कोटी रुपये फसवणूक झाली आहे.



    अनेक बँकांनी ऑनलाइन फसवणुकीमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बँकांनी काही निवडक जिल्ह्यांना बँक खाते उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया कडक करण्यास सांगितले आहे. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रे किंवा कागदपत्रांशी छेडछाड करून खाती उघडली जातात. ही खाती वापरून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फसवणूक कोठून केली जात आहे, याची माहिती गृह मंत्रालय घेऊ शकते, त्यानंतर त्या सर्व ठिकाणी नवीन बँक खाती उघडण्यासाठी वेगळी केवायसी प्रक्रिया असावी.

    cyber Crime increase in India; 1.38 lakh crore lotted

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते