वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात केली असून ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. Covid 19 less coronavirus infection After 81 days less than 60000 new coronaviruses were registered india
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील बाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे.
देशात २४ तासांत ५८,४१९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.