• Download App
    महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश । CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh

    महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश

    CM Shivraj Singh Chauhan : कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, आपल्या शेजारील राज्यांमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, आपल्या शेजारील राज्यांमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

    महाराष्ट्रालगतच्या जिल्ह्यांमधील कोरोनाचे वाढलेले संक्रमण लक्षात घेता आता फक्त मालवाहू वाहने, अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत परवानगी देण्यात येणार आहे. शिवराजसिंह चौहान यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर म्हटले की, राज्यातील सर्व जनतेने मासक घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    शिवराजसिंह चौहान म्हणाले की, स्वतः मास्क घालण्याबरोबरच इतरांनाही प्रेरित करणे आवश्यक आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर ते लॉकडाउनचा निर्णय घेऊ शकतात. रविवारपासून कोणत्याही जिल्ह्यात लॉकडाउन लागू शकते.

    CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना