विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज दुहेरी चारधाम महामार्ग प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या रुंदीकरणाला हिरवा कंदील दर्शविला. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून भूतकाळामध्ये आपल्याला यामुळेच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते, असे न्यायालयाने नमूद केले.CharDham corridor will cleared by Court
लष्करासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे महत्त्व नाकारता येत नाही तसेच त्याबाबत न्यायालय देखील अंदाज बांधू शकत नाही असे न्या. डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगतानाच यावर देखरेख ठेवण्यासाठी माजी न्या. ए.के.सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक सदस्यीय समिती स्थापन केली.
ही समिती या प्रकल्पाच्या पाहणीचा अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करू शकेल. चारधाम महामार्ग प्रकल्प हा ९०० किलोमीटरचा असून त्याच्यावर बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे सर्व ऋतूंमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथपर्यंत जाता येईल.
CharDham corridor will cleared by Court
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससीचा संतापजनक कारभार, आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे नाव मुलाखतींच्या यादीत
- कर्नाटकातील राजकीय घर, चार सख्खे भाऊ आमदार मात्र वेगवेगळ्या पक्षात
- केंद्राची भेट, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र
- SANJAY RAUT : आप आए,बहार आई….संजय राऊतांचा किस्सा खुर्ची का नंतर राहुल गांधींसाठी खास गाणं ; व्हिडिओ व्हायरल …