वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालला जलजीवन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारने ७ हजार कोटी दिलेले आहेत. Centre allocates Rs 7,000 crore to West Bengal under Jal Jeevan Mission
जलजीवन अभियान राज्यात प्रभावी राबविता यावे यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरघोस चारवेळा तरतूद केली आहे. यंदाची तरतूद ही गेल्या वर्षीपेक्षा चारपट अधिक असल्याची माहिती केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दिली आहे. २०१९-२०२० मध्ये ९९५.३३ कोटी तर २०२०ते २०२१ मध्ये वाढवून १,६१४.१८ कोटी केली होती. यंदा ती सुमारे ७ हजार कोटी ( ६९९८.९७ कोटी रुपये ) केली आहे.
संथ कारभार आणि दिलेल्या निधीचा वापर न करण्याच्या वृत्तीमुळे राज्य सरकार दिलेल्या निधीचा विनियोग करत नाही. त्यावर जलशक्ती मंत्रालयाने नाराजी व्यक्त कवलो आहे. आता सरकारने अभियान वेगाने राबविण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत ग्रामीण भागातील ४०.१० लाख घरांना पिण्याच्या पाणी नळीतून २०२० ते २०२१ मध्ये पुरविणार आहे. २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये ५२.७४ लाख घरांना नळाने पाणी देण्याची योजना आहे.
गेल्या महिन्यात राज्यांना निधी
– गुजरात : ३४१० कोटी
– मध्यप्रदेश : ५११७ कोटी
-आठ उत्तर पूर्व राज्यांना : १६०५ कोटी
Centre allocates Rs 7,000 crore to West Bengal under Jal Jeevan Mission
महत्त्वाच्या बातम्या
- Sputnik V Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने स्पुतनिक व्ही लस निर्मितीसाठी DCGI ला मागितली परवानगी
- सोशल मीडियावर तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती : युजर्सच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅप, फेसबुकला आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागणार; अशी करा तक्रार
- महाराष्ट्र सरकारची घोषणा, आपले गाव ‘कोरोना मुक्त’ करा आणि 50 लाखांचे बक्षीस मिळवा
- बुलडाण्यात आठ वर्षीय बालकाला कोरोना रुग्णांचे टॉयलेट स्वच्छ करायला लावले, व्हायरल झाला व्हिडिओ