विशेष प्रतिनिधी
मुबंई: भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने नवीन इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मितालीने ६१ धावांची खेळी केली आणि नवीन विक्रम रचला गेला. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टेस्ट क्रिकेट सामने मिळून मितालीने आजवर २०००० धावांचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटर बनली आहे.
Captain of india’s women cricket team has set new record of 20000 runs
एकूण २१७ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधून तिने ७३०४ धावा केल्या आहेत. तर ११ कसोटी सामन्यांमध्ये ६६९ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमधील तिचा आजवरचा हायेस्ट स्कोअर आहे २१४. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मितालीने एकूण २३६४ इतक्या धावा बनवल्या आहेत. टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये एकूण १७ अर्धशतके झळकावली आहेत. तर स्थानिक क्रिकेटमध्येही मितालीने नेहमीच धावांचा डोंगर रचला आहे. या सर्व प्रकारांमध्ये तिने एकूण २०००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिच्या या विक्रमाबद्दल बीसीसीआयने तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
१९९९ मध्ये मितालीने भारताकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. मागील २२ वर्षांमध्ये तिने आपल्या खेळाचे जबरदस्त प्रदर्शन नेहमीच केले आहे. सर्वात जास्त धावांचा विक्रम करण्यासोबतच तिने आणखी एक विक्रम केला आहे. तो म्हणजे सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द खेळलेली ती दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरली आहे. सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारा क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. आणि त्याच्यानंतर होता श्रीलंकेचा सनथ जयसूर्या. आता मितालीने सनथ जयसूर्याला मागे टाकून या यादीमध्ये दुसरा नंबर पटकावला आहे.
Captain of india’s women cricket team has set new record of 20000 runs
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- 21 हजार कोटींचे हेरॉईन जप्त झाल्याची अंमलबजावणी संचालनालयाने घेतली दखल, मनी लाँडरिंगची करणार चौकशी
- जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त
- तालिबानला मान्यता देण्यासाठी चीनचा उतावीळपणा, आर्थिक निर्बंध लवकर उठवण्याचे जगाला केले आवाहन