वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टाटा समूहाच्या टाटा कम्युनिकेशन्समुळे सरकारी तिजोरीचे 645 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. कॅगच्या ताज्या अहवालात ही बाब समोर आली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या CAG अहवालानुसार, कंपनीने 2006-07 ते 2017-18 या कालावधीत कमी एकूण महसूल नोंदवला, ज्यामुळे सरकारला परवाना शुल्क आकारणीच्या बाबतीत तोटा सहन करावा लागला.CAG report alleges Tata Communications Company defrauded the government to the tune of 645 crores
ही रक्कम टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडकडून वसूल करण्याची गरज असल्याचे कॅगने म्हटले आहे. CAG ने म्हटले आहे की, “TCL ने मंजूर केलेल्या NLD, ILD आणि ISP-IT परवान्यांच्या संदर्भात नफा-तोटा स्टेटमेंटची ऑडिट छाननी आणि बॅलन्स शीटचे AGR स्टेटमेंट ऑडिट करण्यात आले. ही लेखापरीक्षण छाननी 2006-07 ते 2017-18 या कालावधीतील विवरणपत्रासाठी करण्यात आली. यामध्ये हे उघड झाले की कंपनी एकूण महसूल 13,252.81 कोटी रुपयांनी कमी नोंदवत आहे, ज्यामुळे परवाना शुल्क आकारणी 950.25 कोटी रुपयांनी कमी झाली.
कंपनीवर खूप देणी बाकी
कॅगच्या अहवालानुसार, दूरसंचार विभागाने (DoT) कंपनीकडून परवाना शुल्क म्हणून केवळ 305.25 कोटी रुपये जमा केले आहेत. अहवालानुसार, ‘दूरसंचार विभागाने काढलेल्या 305.25 कोटी रुपयांचे परवाना शुल्क वजा करून, कंपनीकडे संबंधित कालावधीसाठी 645 कोटी रुपये देणे बाकी आहे. ही रक्कम कंपनीकडून मागवून ती वसूल करण्यात यावी.
आणखी नुकसान होऊ शकले असते
कॅगने म्हटले आहे की, “आम्ही स्पेक्ट्रम शुल्कासाठी किमान दर एजीआरच्या 0.15 टक्के विचार केला तरीही, अगदी उदारमतवादी गणनेतदेखील E आणि V बँड्सच्या एकाच कॅरियरमध्ये 67.53 कोटी रुपयांच्या महसूल नुकसानाचा अंदाज देते.” दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांनी 2020-21 या वर्षासाठी दिलेल्या सरासरी AGR माहितीनुसार, केवळ एका सर्कलमध्ये महसूलाचे वार्षिक नुकसान 3.30 कोटी रुपये आहे. ई आणि व्ही स्पेक्ट्रमच्या लिलावात विलंब झाल्यामुळे महसुलाचे नुकसान केवळ सूचक असल्याचेही कॅगने म्हटले आहे. महसुलाचे वास्तविक नुकसान यापेक्षा जास्त असू शकते.
CAG report alleges Tata Communications Company defrauded the government to the tune of 645 crores
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये कुमारांची सत्तापालटू नीती; नव्या सरकारचा असा असू शकतो फॉर्म्युला!!
- बेपत्ता मुलांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची “ऑपरेशन “री-युनाईट” मोहीम!!
- पहिले पाढे 55 : बिहारमध्ये नितीश कुमार – तेजस्वीचा सरकार स्थापनेचा दावा; 164 आमदारांच्या पाठिंब्याचे राज्यपालांना पत्र!!
- Azadi Ka Amrit Mahostav : 1942 चले जाव आंदोलन जनजागृतीत यशस्वी, पण परिणामतः अयशस्वी!!; हे अगदी गांधीवाद्यांचेही म्हणणे!!