वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी विजय रथयात्रेवर निघालेल्या अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav
पण ४०० जागा जिंकण्याचा हा दावा करून त्यांना बरेच दिवस झाले, पण आज त्यांनी मागचे राजकीय तर्कशास्त्र सांगितले आहे. उत्तर प्रदेशात भाजप विद्यमान १५० आमदारांची तिकीटे कापणार आहे. त्यापैकी १०० आमदारांनी भर विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. समाजवादी पक्षाकडे सध्या ५० आमदार आहेत. अर्थात भाजप बंडखोर आणि आमची बेरीज मिळून आताच २०० आमदारांची होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीनंतरची आकडेमोड तर अधिक सोपी आहे. भाजप बंडखोर आणि समाजवादी पक्ष मिळून ३०० आमदारांचा आकडा सहज पार करू शकू, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.
BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नवाब मलिकांची पीएम मोदींवर टीका, म्हणाले- मोदीजी आता कुणाच्या नशिबाने भाव वाढवत आहेत. तुमच्या की जनतेच्या?
- दिल्ली विद्यापीठात ‘ नंबर जिहाद’ ; जेएनयूनंतर बनतेय काँग्रेस, तुकडे तुकडे गँग आणि देशद्रोही जिहादी डाव्या पक्षांचा अड्डा
- तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही अम्मांच्या सावलीत अण्णा द्रमूकच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन, पण पक्ष करिष्माई नेत्याच्याही शोधात!!
- पेट्रोल – डिझेलचे भाव भडकलेले असताना किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती
- चिंचवड भोसरीच्या आमदारांनी दुकान नव्हे मॉल थाटलेत – शरद पवारांचा घणाघात