rajya sabha : सोमवारचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुदुचेरीतून भाजप उमेदवार एस. सेल्वागणबथी यांची, तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आसामच्या जागेसाठी रिंगणात असलेले एकमेव उमेदवार सोनोवाल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आल्याचे घोषित केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोमवारचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुदुचेरीतून भाजप उमेदवार एस. सेल्वागणबथी यांची, तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आसामच्या जागेसाठी रिंगणात असलेले एकमेव उमेदवार सोनोवाल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आल्याचे घोषित केले. यासह आसाममधून वरच्या सभागृहात सत्ताधारी भाजपचे संख्याबळ तीन झाले, तर त्यांचे सहयोगी असम गण परिषदेचे (एजीपी) राज्यसभेत एक सदस्य आहे. आसाममध्ये राज्यसभेच्या एकूण सात जागा असून त्यापैकी दोन जागा काँग्रेसकडे आणि एक अपक्ष खासदारांकडे आहे.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांच्यासह सोनोवाल यांनी दुपारी विधानसभेच्या आवारातून निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा दाखला घेतला. पत्रकारांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की, राज्याच्या भल्यासाठी आणि नागरिकांच्या उन्नतीसाठी काम सुरू राहील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आसामच्या लोकांचा आणि विशेषतः माजुली लोकांच्या माझ्यावरील अतूट विश्वासाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.”
दुसरीकडे, भाजपाध्यक्ष जेपी नड्ड यांनीही दोन्ही खासदारांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “ऐतिहासिक! राज्यसभेवर भाजपचे पुदुचेरीतून पहिलेवहिले खासदार एस. सेल्वागणपती जी यांचे मी अभिनंदन करतो. सर्वानुमते त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. शिवाय सर्बानंद सोनोवालजी यांचेही आसाममधून बिनवरोध निवडीबद्दल अभिनंदन!”
महत्त्वाच्या बातम्या
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली
- पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला, ग्वादरमध्ये बलुच बंडखोरांचे कृत्य
- ‘भारत बंदची हाक देणाऱ्या संघटना तालिबानी’, बीकेयू – भानुच्या अध्यक्षांचे वक्तव्य, राकेश टिकैतांवरही डागली तोफ
- पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…